पीएम किसान सम्मान (PM KISAN) निधि योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दर वर्षी प्रमाणे 6000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती परंतु मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार शेतकऱ्यांना मिळणारी ही सुविधा डबल करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर भारतातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये एवजी 12,000 रुपये हे तीन हप्त्यांत आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. सरकारने या योजनेच्या जुन्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. आता पी एम किसान सन्मान Pm Kisan योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल ज्यांच्या नावावर शेती असेल म्हणजे पहिल्याप्रमाणे वारसागत जमिनीत भागीदारी असलेल्या आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या नावावर म्हणजे स्वतःच्या नावावर शेती असेल तर ताबडतोब हे काम करा अन्यथा तुमच्या पुढील हप्ता मिळणार नाही.
तुम्हाला द्यावी लागेल ही माहिती
सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत. किसान सम्मान निधि योजना नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्जामध्ये जमिनीचा प्लॉट नंबर सुद्धा सांगावा लागणार आहे. मात्र नवीन नियमांचा प्रभाव योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर पडणार नाही असे त्यानी स्पष्ट केले आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो हा पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ
या पी एम किसान PM Kisan योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत ज्यांच्या कडे 3 हेक्टर म्हणजेच 5 एकर शेती असेल. तसेच इन्कम टॅक्स (Income Tax) भरणारे शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवले जाईल यामध्ये वकील, डॉक्टर्स, सीए इत्यादी सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
तुमचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कोणत्या महिन्यात मिळतो.
शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात ते 3 हप्त्यात पाठवले जातात. दर 4 महिन्यात 2000 रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळतो.पी एम किसान योजनेचा पहिला हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकऱ्यांना मिळत असतो. मात्र दुसरा हप्ता हा 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांना मिळतो. आणि तिसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.
पी एम किसान योजनेचे तुमचे पैसे मिळत नाहीत.
- बरेच बँका हा बदलल्यामुळे तुमचे खाते नंबर बदलले असल्यामुळे तुमचे पी एम किसान योजनेचे अकाउंट बंद झाले आहे. त्यामुळे तुमचे पैसे येण्याचे अडथळे निर्माण झालेले दिसून येत आहेत.
- अनेक शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार मध्ये वेगवेगळे नाव असणे या कारणामुळे सुद्धा अशी अडचण येत असते.
- काही शेतकर्यांचे आयएफएससी कोड व बँक अकाउंट नंबर बरोबर नसने.
- एक शेतकऱ्यांची नावे इंग्लिश मध्ये असणे आवश्यक आहे.
- गावाचे नाव लिहिण्यास चूक झाली असेल तर
अशा वरील प्रकारच्या कारणांमुळे तुमच्या पी एम किसान योजनेचे अकाउंट बंद झाले असेल. तर ते तुम्ही नजीकच्या तहसील कार्यालय किंवा सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट चेक करू शकता.