मृत्यू नंतर मृतदेह कडक का होतो?
माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते ही अवस्था तीन ते चार तासात होते.
त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येताना स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.
स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टी न नावाचे तंतू असतात. त्यांना आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते आकुंचन पावल्या नंतर स्नायू कडक होतो तर प्रसारणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मयोसिन व ॲक्टिन हे तंतु एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. सहाजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायु व पर्यायाने मृत्यू देह कडक होतो या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅस असे म्हणतात.
Why the corpse is stiff after death
भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर दोन ते तीन तासांनी सुरू होते ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे बारा तास लागतात त्यानंतर बारा तासात परत शिथिल होते. मायोसीन व ॲक्टीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंना कडकपणा जातो.
रायगर मुळे मृत्यूचा वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो दुसरे म्हणजे मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती. हेही कळू शकते असे हे रायकर मिर्टी स म्हणजेच मृतदेहांचे खडक होणे गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जनु मृतदेह ही मदत करतो.